Sunday, October 10, 2010

अयोध्या निकाल - जय भारत !!

सात दिवसांची अनिश्चितता एकदाची संपली. कालच्या निकालामुळे कदाचित सर्व वादी-प्रतिवादी पक्षांचे समाधान झाले नसेल पण एक गोष्ट मात्र नक्कीच अधोरेखीत झाली जी आत्तापर्यंत दोन्ही बाजूंच्या कट्टरपंथीयांकडून जाणून बुजून दुर्लक्षीत केली जात होती.

असं म्हणतात की रिकामे डोके सैतानाचे घर असते, आणि नेहमीच त्या सोबत दोन रिकामे हातही असतात. दुर्दैवाने काल पर्यंत दोन्ही बाजूचे काही स्वार्थी आणि दांभिक नेते ह्या रिकाम्या हातांना शस्त्र उचलायला भाग पाडण्यात यशस्वी ठरले होते. पण काल भारताच्या नविन पिढीने (रिकामे हात नेहमीच तरुणांचे असतात) हे दाखवून दिले आहे की आता त्यांना हातामधे शस्त्र नको तर रोजीरोटीची साधने हवी आहेत.

आज भारत इतिहासातल्या जुन्या कटू आठवणी विसरून प्रगतीच्या वाटेवर उज्वल भवितव्याकडे जाण्यासाठी अधिक उत्सुक आहे. सर्वच राजकीय आणि धार्मिक संघटनांनी ही जनभावना ओळखून त्याचा आदर करण्याची वेळ आली आहे.

संपूर्ण जगाला काल एक समाज आणि राष्ट्र म्हणून जे परिपक्वतेचे उदाहरण भारताने दिले आहे त्याला माझा मानाचा मुजरा. जय भारत !!

No comments:

Post a Comment