श्री. भालचंद्र देशपांडे यांनी लिहिलेले ‘अंधार इथला संपत नाही’ हे पुस्तक वाचले. आत्महत्या करणार्या शेतकर्यांबद्दल एका पत्रकारानी केलेले संशोधन असा विषय आहे. कथा काल्पनिक असली तरी एकदम जखडुन ठेवणारी आहे. बर्याच दिवसानी एका बैठकीत पुस्तक वाचुन काढले.
पुस्तक वाचल्यानंतर एका आत्महत्या करण्याच्या निर्णयाला आलेल्या शेतकर्याच्या दृष्टीकोनातून एक कविता लिहिली आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल.
----
गळ्याभोवती रुमालाची घट्ट त्याच्या गाठ आहे
नजर त्याची बजावते आता माझ्याशी गाठ आहे
मुजोर सत्ताधार्यांनी पाळलेला गुंड तो
तरीही आज माझ्यापेक्ष्या मान त्याची ताठ आहे
गरीब मुक्या जनतेचे संसार उघडे नागडे
त्याला मात्र झोपायला चंदनाची खाट आहे
सत्तेच्या खुर्चीचा एक भक्कम पाय तो
कोरडे ओढायला नेहमीच माझी पाठ आहे
जातोच आहे आता त्या जगदीशाच्या भेटीला
विचारीन त्यालाच "आमोद" किती दूर पहाट आहे
No comments:
Post a Comment