Saturday, December 10, 2011

मी हजार चिंतांनी

संदीप खरेची ‘मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो’ ही कविता ऐकून मला नाही वाटत कोणी अस्वस्थ व्हायचा राहिला असेल. किती छान सोप्या शब्दात त्यानी आपल्या व्यंगावर बोट ठेवले आहे.

पण कवितेत वर्णिल्याप्रमाणे बेबंध, बेधुंद जगणे कितीही ‘रोमॅंटिक’ वाटले तरीही ‘प्रॅक्टीकल’ नक्कीच नाही हे सत्य कवितेची नशा ओसरल्यावर विदारकपणे समोर येते. ते सत्य संदीपचेच शब्द वापरून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
‘म्हणूनच’ तो कट्ट्यावर बसतो शीळ वाजवतो

आम्हासही वाटे मोकळ्या मनाने हरावे
आनंदासाठी खेळण्याच्या खेळावे
पण आम्हास नसते हरण्याची परवानगी
म्हणून आम्ही हा डाव रडीचा करतो

No comments:

Post a Comment