२०११ आज संपणार. एक वर्ष संपते म्हणजे नक्की काय? काही जणांसाठी फक्त ३६५ दिवस संपले तर काही लोकांची पूर्ण जीवनयात्रा. काहींना ‘हुश्श’ झाले असेल; तर काहींना ‘का संपले?’ असे वाटत असेल. प्रत्येक वर्ष आपल्या मनावर त्याचा असा वेगळा ठसा उमटवून जाते. ह्या सरत्या वर्षानी माझ्या स्मृतीच्या वाळूवर मागे सोडलेल्या काही पाऊलखुणा.
वैयक्तीक :
- मी सिगरेट सोडली
सामाजीक - राजकीय - वैश्विक :
- ओसामा बिन लादेनचा अंत
- भारत क्रिकेटचा जगज्जेता
- भारतातले विविध घोटाळे
- जनलोकपाल आंदोलन
- शरद पवारांना मारलेली थप्पड
आर्थिक :
- वाढती महागाई आणि व्याजदर
- रोखेबाजारातील पडझड
हूरहूर :
- भीमसेन जोशी
- जगजीत सिंग
- देव आनंद
- शम्मी कपूर
Friday, December 30, 2011
Saturday, December 10, 2011
मी हजार चिंतांनी
संदीप खरेची ‘मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो’ ही कविता ऐकून मला नाही वाटत कोणी अस्वस्थ व्हायचा राहिला असेल. किती छान सोप्या शब्दात त्यानी आपल्या व्यंगावर बोट ठेवले आहे.
पण कवितेत वर्णिल्याप्रमाणे बेबंध, बेधुंद जगणे कितीही ‘रोमॅंटिक’ वाटले तरीही ‘प्रॅक्टीकल’ नक्कीच नाही हे सत्य कवितेची नशा ओसरल्यावर विदारकपणे समोर येते. ते सत्य संदीपचेच शब्द वापरून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
‘म्हणूनच’ तो कट्ट्यावर बसतो शीळ वाजवतो
आम्हासही वाटे मोकळ्या मनाने हरावे
आनंदासाठी खेळण्याच्या खेळावे
पण आम्हास नसते हरण्याची परवानगी
म्हणून आम्ही हा डाव रडीचा करतो
पण कवितेत वर्णिल्याप्रमाणे बेबंध, बेधुंद जगणे कितीही ‘रोमॅंटिक’ वाटले तरीही ‘प्रॅक्टीकल’ नक्कीच नाही हे सत्य कवितेची नशा ओसरल्यावर विदारकपणे समोर येते. ते सत्य संदीपचेच शब्द वापरून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
‘म्हणूनच’ तो कट्ट्यावर बसतो शीळ वाजवतो
आम्हासही वाटे मोकळ्या मनाने हरावे
आनंदासाठी खेळण्याच्या खेळावे
पण आम्हास नसते हरण्याची परवानगी
म्हणून आम्ही हा डाव रडीचा करतो
Subscribe to:
Comments (Atom)